शिवप्रेमींचा पुतळा उभारण्यास विरोध
प्रतिनिधी /पणजी
म्हापसा एकता नगर येथे एका रात्रीत रमजान ईदच्या दवशीच रात्री इसमांनी रस्त्याच्या बाजूला शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उभा केला आहे. हा पुतळा नेमका कुणी उभा केला, याबाबत सर्वजण संभ्रमात पडले असून येथे धार्मिक तेढ निर्माण होऊ नये. यासाठी म्हापसा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांनी हा पुतळा उभारल्याचे मान्य केले आहे. कोणत्याही परिस्थित हा पुतळा तेथून हटवावा, अशी सूचना पोलिसांनी संबंधित चार जणांना दिली आहे.
बुधवारी संध्याकाळी चार वाजता तो तिथून हटवावा अशी सूचना पोलिसांनी केली असता त्या चौघांना स्थानिक आमदारांना याबाबत माहिती देत सदर पुतळा तेथून कदापि हटविणार नाही, असे सांगितले. दरम्यान, म्हापशातील शिवप्रेमींना समजल्यावर प्रशांत वाळके. रमेश नाईक, जयेश थळी, सिद्धार्थ मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 40 शिवप्रेमी तेथे जमा झाले व तो अर्धपुतळा कोणत्याही परिस्थितीत हटवू देणार नाही, असे स्पष्ट केले. या विरोधात संघटितपणे उभे राहण्याचा निर्णय यावेळी त्यांनी घेतला. या प्रकरणी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदनही सादर केले.
आम्हा सोपस्कार पूर्ण करणार : प्रशांत वाळके
प्रशांत वाळके यावेळी म्हणाले की, शिवाजी महाराजांचा हा पुतळा मोकळय़ा जागेत उभारला आहे. त्याच कुणालाच त्रास होणार नाही. पोलिसांनी यात नाहक ढवळाढवळ करू नये. हे सर्व देशप्रेमी लोक आहेत. जे काही सोपस्कार आहेत ते आम्ही पूर्ण करणार. चांगल्या गोष्टीच्या मागे आम्ही नेहमी पाठीशी आहोत. प्रत्येक वॉर्डा शिवाजी महाराजांचा पुतळा व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
क्रॉसवर कारवाई करण्यास दरंगाई
2016 मध्ये समतानगर येथे बेकायदेशीर क्रॉस उभारला आहे. याबाबत आम्ही तक्रार देऊनही चार वर्षे उलटली. मात्र याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. मग शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाबाबत इतकी घाई का?असा सवाल जयेश थळी यांनी केला. कोणत्याही परिस्थित महाराजांचा पुतळा हटविण्यास देणार नाही. आम्ही संरक्षण देणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिम्मत असल्यास पुतळय़ाला हात लावून दाखवा
ज्या युवकांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस पुढे आले. कोणाचीही तक्रार नसताना पोलिस नाक का खुपसतात., असा सवाल सदशिव सामंत यांनी केला. कुणाची हिम्मत असेलतर पुतळय़ाला हात लावून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.
तक्रार कुणी दिली ते सांगा
वास्तविक पोलीस येथे का आले हे माहीत नाही. आमदार जोशुआ फर्नांडिस यात मध्ये पडल्यामुळे पोलीस येथे आल्याचे समजले. तक्रार कुणी दिली ते सांगा. यात आमदाराच दबाव नसेलतर त्यांनी सांगावे, हे सहन केले जाणार नाही, असे रमेश नाईक यांनी सांगितले. पोलिसांनी प्रथम क्रॉसवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.