काँग्रेसतर्फे कलश यात्रेला सत्तरीतून प्रारंभ : सर्व तालुक्यांत कलश यात्रा जाणार
प्रतिनिधी /वाळपई
विर्डी येथे सोमवार दि. 16 रोजी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय सभेमध्ये गोव्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षातर्फे नानोडा-बांबर या ठिकाणी म्हादई नदीच्या काठावर कलश यात्रेला सुऊवात झाली. यावेळी वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
पारंपारिक सांगणे करून व जलकलशाची पूजा करून या यात्रेला सुऊवात करण्यात आली. म्हादई नदीच्या रक्षणासंदर्भात कोणीही राजकारण करु नये. हा लढा सर्वांच्या हिताचा आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. सर्व नागरिकांनी या नदीच्या रक्षणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून या लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या लढ्याला पाठिंबा द्यावा, अशी विनंती यावेळी आमदार कार्लोस आल्मेदा यांनी केली.
हा लढा पूर्णपणे राजकीय विरहित आहे. कोणीही या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. पाणी हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. यामुळे नदीचे अस्तित्व नष्ट झाल्यास प्रत्येकाचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. यामुळे येणाऱ्या भविष्याचा गांभिर्याने विचार करून प्रत्येकाने या लढ्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.
यावेळी उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, वाळपई मतदार संघ काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष कृष्णा नेने, स्थानिक काँग्रेस पक्षाच्या नेत्या मनीषा उसगावकर, रणजीत राणे व इतरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सर्वप्रथम धार्मिक पूजन करून या यात्रेला सुऊवात करण्यात आली.
यावेळी प्रत्येकाने म्हादई नदीच्या रक्षणाची शपथ घेतली व शेवटपर्यंत यासाठी महत्त्वाचे योगदान देणार असल्याचे घोषित केले.