ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshiyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदसह आज डेक्कन परिसरातून मूक मोर्चाही काढण्यात आला आहे. या मोर्चात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Aandhare) सहभागी आहेत. मोर्चादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
अंधारे म्हणाल्या, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांच्याकडून महापुरूषांचा अवमान होत असताना उपमुख्यमंत्री फडणवीस मात्र मौन बाळगून होते. पण पंतप्रधान मोदींना रावण म्हटल्यानंतर त्यांनी तत्परतेने प्रतिक्रिया दिली. भाजप आणि फडणवीस अशा नेत्यांना पाठीशी घालत असतील तर हे वाचाळवीर भाजपला बुडविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा अंधारे यांनी फडणवीसांना दिला.
अधिक वाचा : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सिल्व्हर ओकवर आला फोन
फडणवीसांनी लोकांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोणीही आतार्पंत माफी मागितली नाही. सर्व नेत्यांमध्ये मस्तवालपणा आला आहे. काहीही केलं तरी भाजप आम्हाला वाचवणार आहे, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे फडणवीसांनी लोकांच्या भावना समजून घ्याव्यात. ते राज्याचे गृहमंत्री आहेत. किमान त्यांनी सभागृहात निंदाजनक ठराव घ्यावा, असेही अंधारे म्हणाल्या.