ऑनलाईन टीम / मुंबई
देशात सोमवारपासून अनलॉक 1.0 सुरू होत आहे. अनलॉक 1.0 मध्ये केंद्र सरकारकडून बऱ्याच गोष्टींमध्ये सूट दिली आहे. मात्र कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्यामुळे काही राज्यांनी अद्याप हॉटेल, मॉल्स, सलून आदींसह धार्मिक स्थळे सुरू करण्यास अनुमती दिली नसल्याने व्यवहारांवर निर्बंध कायम राहणार आहे. परिवहन आणि एक खासगी बस सेवा अंशता सुरू करण्यास अनुमती देण्यात आली असली तरी स्वच्छता व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
केंद्र सरकारकडून याआधीच झोननुसार काही सवलती दिल्या होत्या. मात्र आता राज्यांनी आपल्या अधिकारांतर्गत काही नियम कडक केले आहेत. सहाजिकच केंद्रसरकारने काही बाबींना अनुमती दिली असली तरी राज्य सरकारने बहुतांश अटी व शर्ती कायम ठेवल्यामुळे व्यवहारांवर निर्बंध कायम राहणार आहेत देशात रुग्णांची संख्या नियंत्रणात आणणे अवघड झाले आहे तरीही तीन महिन्यांपासून बरेच व्यवहार ठप्प झाल्यामुळे ‘लॉकडाऊन5’ ची घोषणा करतानाच केंद्र सरकारने अनलॉक 0.1लाही अनुमती दिलेली आहे आणि अनलॉक 0.1 मुळे काही सेवा सुविधा सुरू केल्याने देशातील अनेक ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
‘अनलॉक’ चे तीन टप्पे
देशात पहिल्या टप्प्यात 8 जून पासून हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे सुरू करण्यात येणार आहेत. तर दुसर्या टप्प्यात शाळा महाविद्यालय व शैक्षणिक संस्था सुरू करण्यात करण्याचा विचार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात आढावा घेऊन रेल्वे, मेट्रो, विमानसेवा, बार, थेटर्स आधी सेवा सुरू करण्यात येणार आहेत.
राज्यात खाजगी कार्यालय आजपासून सुरू होणार
‘मिशन बिगिन अगेन’ या अभिनयाअंतर्गत महाराष्ट्र सरकारने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा प्रयत्न घेतला आहे. त्याची सुरुवात 3 जून, 5 जून आणि 8 जून अशा तीन टप्प्यात केली आहे. 8 जूनच्या टप्प्यात सर्व खाजगी कार्यालय 10% मनुष्य बाळासह सुरू करण्यात येणार आहे. तसेच एसटी परिवहन बस वाहतूक केवळ जिल्हांतर्गत 50% क्षमतेने सुरू होणार आहेत. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी लॉकडाऊन 5च्या निर्बंधामध्ये शिथीलता आणताना सरकारने अनेक गोष्टींना अटी आणि शर्तीवर परवानगी दिली आहे. सोमवारपासून खाजगी कार्यालय 10% मनुष्य बाळासह परवानगी देताना इतर कर्मचारी घरातून काम करतील, कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक अंतर, सॅनिटाझेशन या नियमांचे पालन करावे लागणार.
मुंबई महानगर प्रवेश परिसरात तसेच नजीकच्या शहरातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता या शहरांमध्ये शाळा-महाविद्यालये, खाजगी क्लासेस, व्यायामशाळा, चित्रपटगृह, सलून आदींना अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही.
शाळा महाविद्यालय 15 ऑगस्ट पर्यंत बंदच
कोरोना साथीमुळे 10 मार्चपासून देशातील शाळा महाविद्यालय बंद आहेत काही काही परीक्षा झाल्या असल्या तरी अद्याप निकाल लागलेले नाही त्यामुळे देशातील 33 कोटी 36 अधिक विद्यार्थी शाळा केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत मात्र येत्या 15 ऑगस्ट पर्यंत शाळा सुरू होणार नसल्याचे संकेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश निकष पोखरियाल यांनी दिली आहे तसेच आतापर्यंत झालेल्या परीक्षांचे निकाल ऑगस्टपूर्वी जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही राज्यांनी जुलैपासून शाळा महाविद्यालय सुरू करण्यासाठी सोशल डिस्टन्स आणि सम विषम चा तोडगा काढण्याचा प्रयत्न चालवला आहे मात्र चालू महिना अखेरपर्यंत करून अग्रस्थान चा आकडा वाढतच राहिला राहिल्यास जुलैपासून शाळा सुरू होणे अवघड होणार आहे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षण आणि पालक शिक्षक आणि पालक संघटनांची बोलणी सुरू ठेवली आहे.
बँकांच्या वेळांमध्ये बदल
केंद्र सरकारकडून याआधीच झोननुसार काही सवलती दिल्या होत्या. मात्र आता राज्यांनी आपल्या अधिकारांतर्गत काही नियम कडक केले आहेत. सहाजिकच केंद्रसरकारने काही बाबींना अनुमती दिली असली तरी राज्य सरकारने बहुतांश अटी व शर्ती कायम ठेवल्यामुळे व्यवहारांवर निर्बंध कायम राहणार आहेत देशात रुग्णांची संख्या नियंत्रणात आणणे अवघड झाले आहे तरीही तीन महिन्यांपासून बरेच व्यवहार ठप्प झाल्यामुळे ‘लॉकडाऊन5’ ची घोषणा करतानाच केंद्र सरकारने अनलॉक 0.1लाही अनुमती दिलेली आहे आणि अनलॉक 0.1 मुळे काही सेवा सुविधा सुरू केल्याने देशातील अनेक ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.