जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे सुधारित आदेश
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर, माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला या पाच तालुक्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी कायम असून उर्वरित अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, मंगळवेढा आणि मोहोळ या सहा तालुक्यातील संचारबंदीत शिथिलता दिली आहे. त्या पाच तालुक्यात 23 ऑगस्ट सकाळी सातपासून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नवीन आदेश जारी केले आहेत. आता अत्यावश्यक सेवाशी निगडीत असलेली दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कोरोना प्रादुर्भाव असलेल्या पंढरपूर, माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला या पाच तालुक्यांना वगळून कोरोना कमी झालेल्या उर्वरित अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, मंगळवेढा आणि मोहोळ या सहा तालुक्मयांत 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट रोजीचे निर्बंध कायम असतील, असे सांगितले.
त्या पाच तालुक्यांत दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू असणार, बिगर अत्यावश्यक सेवा चार वाजेपर्यंत, चित्रपटगृह बंद, हॉटेल 50 टक्के क्षमतेने पार्सल सेवा, सार्वजनिक ठिकाणचे मैदाने सकाळी पाच ते नऊपर्यंत सुरू राहणार, शासकीय कार्यालय 50 टक्के, मेळावे 50 टक्के क्षमतेने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.