वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
कोव्हिड-19 चे समूळ उच्चाटन झाले व दोन्ही केंद्र सरकारनी परवानगी दिली तर भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात ऑगस्ट महिन्याच्या अखेर तीन सामन्यांची टी-20 मालिका होऊ शकते, असे संकेत आहेत. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार ही मालिका दोन्ही संघांच्या कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट आहे. पण, सध्या कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धांबद्दल कमालीची अनिश्चिता निर्माण झाली आहे.
भारताने ही मालिका पूर्ण होण्यास संमती दिली असल्याने क्रिकेट दक्षिण आफ्रिकन मंडळही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्ल्डकप न झाल्यास त्याऐवजी आयपीएलमध्ये आपल्या खेळाडूंना पाठवण्यास राजी असेल, असे येथे गृहित धरले जाते.